अमरावतीतल्या बाईंनी भुजबळांसमोर हनुमान चालीसा म्हणावी; संजय राऊत यांचा जोरदार टोला

नाशिकमध्ये एका कार्यक्रमात भाषण सुरू असताना मंत्री छगन भुजबळ यांनी हनुमान चालीसाचा आवाज कमी करण्यास सांगितले. या घटनेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत जबरदस्त टोला लगावला आहे. या घटनेवर भुजबळ यांचे नेते अजित पवार यांनी बोलावे, तसेच अमरातवीतील हनुमान चालीसावाल्या बाईंनी नाशिकमध्ये पोहचायला हवे, असा टोला त्यांनी लगावला.

नाशिकमध्ये एका कार्यक्रमात भाषण सुरू असताना मंत्री छगन भुजबळ यांनी हनुमान चालीसाचा आवाज कमी करण्यास सांगितले, या घटनेबाबत विचारले असता संजय राऊत यांनी जोरदार टोला हाणला. याबाबत अजित पवार यांनी प्रतिक्रिया देण्याची गरज आहे. अमरावतीतील हनुमान चालीसा पठणवाल्या बाई नाशिकला पोहचल्या पाहिजेत. त्यांनी भुजबळांसमोर हनुमान चालीसा म्हणावी, असा जबरदस्त टोला संजय राऊत यांनी लगावला.

आता त्यांच्यात त हिंमत आहे का, भुजबळ हे त्यांच्या पक्षाशी संबंधित आहेत.राज्यात सध्या अनेक बेकायदा गोष्टी सुरू आहेत. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आता राज्यात शिवसेनेचे दौरे सुरू होणार आहेत. राज्यात शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. नाशिकचे शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करून बडगुजर कुटुंबियांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यात असे प्रकार सुरू आहेत. त्याची आम्हाला गंभीर दखल घ्यावी लागेल, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.