भ्रष्टाचाराचा एकच नारा.. तुरुंगापेक्षा भाजपा बरा -संजय राऊत

भाजप विरोधकांवर भ्रष्टाचाराचे भरमसाट आरोप करत आहे, ज्यांच्यावर हे आरोप केले जातात, त्यांनाच ते पुन्हा आपल्या पक्षात घेत आहेत. यावरून या पक्षाच्या नेत्यांना विस्मरणाचा रोग झाला आहे, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी टी. व्ही. सेंटर येथे आयोजित जनसंवाद सभेत केली. भ्रष्टाचाराचा एकच नारा..तुरूंगापेक्षा भाजपा बरा’ अशी सडकून टिकाही त्यांनी केली.

भाजपचा नवा नारा सुरू आहे, हे नमूद करून खासदार संजय राऊत म्हणाले, ‘भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगात जाण्यापेक्षा भाजप बरा’ असा नारा दिला आहे, आज हा नारा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी दिला आहे. आदर्श बिल्डिंगच्या घोटाळा, 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण, अजित पवारांना तुरुंगात टाकायला निघाले होते. भाजप नेत्यांना आता आपल्या पूर्वीच्या वक्त्याचा विसर पडला आहे, अशी टीका त्यांनी केली. यावेळी खासदार राऊत यांनी पंतप्रधान, फडणवीस यांनी केलेले भाषणच ऐकविले. राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या शाखा आता काँग्रेस कार्यालयात, असा टोलाही त्यांनी हाणला.

राज्यात दरोडेखोरांचे राज्य आले आहे, असे मिंधे सरकारवर टीका करून खासदार संजय राऊत पुढे म्हणाले, छत्रपती संभाजीनगरची गद्दारी आमच्या जिव्हारी लागली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर या गद्दारांना धडा शिकविला जाईल, असेही ते म्हणाले.  याप्रसंगी भारतीय कामगार सेनेचे संयुक्त चिटणीस प्रभाकर मते, माजी महापौर नंदकुमार घोडेले, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, माजी महापौर सदाम सोनवणे, उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर  यांचे भाषण झाले.