जेवण चांगले केले नाही म्हणून आजीचा जाळून खून, नातवाला जन्मठेपेची शिक्षा

जेवण चांगले केले नाही, या कारणावरून आजी गीताबाई मारुती साळुंखे (कय 78, रा. राजापुरी, ता. सातारा) यांचा जाळून खून केल्याप्रकरणी त्यांचा नातू शरद बजरंग साळुंखे (कय 36, रा. राजापुरी, ता. सातारा) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड, दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनाकली.

राजापुरी येथे 11 सप्टेंबर 2019 रोजी सायंकाळी नातू शरद साळुंखे याने आजी गीताबाई साळुंखे यांना ‘दुपारी तू जेवण का चांगले केले नाहीस’, असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर चुलीजवळ ठेवलेली रॉकेलची बाटली हातात घेऊन ‘तुला आता जिवंत ठेकत नाही’, असे म्हणत बाटलीतील रॉकेल आजीच्या अंगावर ओतले. आजी आरडाओरड करू लागली तरीही नातू शरद याने काडेपेटी घेऊन आजीला पेटवून दिले. यामध्ये आजी गंभीर जखमी झाली. जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नातू शरद साळुंखे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.

सुनानणीदरम्यान एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य धरून न्यायालयाने शरद साळुंखे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सतीश राघू साळुंखे (रा. राजापुरी, ता. सातारा) याने न्यायालयात शपथेकर खोटी साक्ष दिली, हे निष्पन्न झाल्यानंतर न्यायालयाने त्याच्याविरुद्धही कारवाई करण्याचे आदेश दिले. न्यायालयात शपथेकर अशी खोटी माहिती देणे गुन्हा आहे, असे असतानाही चुकीच्या साक्ष देण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली आहे.

सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता वैशाली पाटील यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांना पोलीस प्रॉसिक्यूशन स्कॉडचे पोलीस उपनिरीक्षक सुनील सावंत, सहायक फौजदार शशिकांत गोळे, अरविंद बांदल, गजानन फरांदे, रहिनाबी शेख, अमित भरते यांनी सहकार्य केले.