RATAN TATA देशाने सच्चा देशभक्त गमावला, अंबादास दानवे यांनी वाहिली श्रद्धांजली

टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांचे बुधवारी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनामुळे देशाने एक सच्चा देशभक्त गमावला अशा शब्दात शिवसेना नेते, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

देशाने आज एक सच्चा देशभक्त गमावला आहे. एक असा व्यक्ती ज्याने त्याच्या आजुबाजुच्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. तुम्ही कायम स्मरणात राहाल. तुम्ही कायम देश प्रथम या तत्वाने जगलात’, असे दानवे यांनी ट्विट केले आहे.