सरकार विषकन्येसारखे! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

मी नेहमी गमतीने म्हणतो की, सरकार विषकन्येसारखे आहे. जिथे सरकारची मदत मिळते तिथे तो प्रयोग बंद पडतो. म्हणून मी कुठल्याही सरकारची मदत घेत नाही, सरकारच्या अधिकाऱयांकडे जात नाही. अधिकाऱयांना गळ घालता घालता डोक्यावरचे केस उडून जातात, अशा शब्दांत केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मिंधे सरकारला सणसणीत टोला लगावला.

भंडारा ते पवनी हा रस्ता निधी मंजूर झालेला असताना केवळ वन विभागाच्या जाचक अटींमुळे तब्बल गेल्या 12 वर्षांपासून बंद पडला आहे. नवीन कुठले कलम असल्यास ते लावा आणि या रस्त्यामध्ये आडकाठी घालणाऱया नतद्रष्ट वन अधिकाऱयांवर गुन्हे दाखल करून त्यांना आत टाका, असे गडकरी म्हणाले.