साडेतीन लाख शेतकऱयांचे ई-केवायसी पूर्ण, नगरमध्ये 5 लाख 30 हजार शेतकरी पात्र

कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी राज्य सरकारच्या वतीने निकषानुसार पात्र असणाऱया नगर जिह्यातील 5 लाख 30 हजार शेतकऱयांपैकी 3 लाख 52 हजार 260 शेतकऱयांच्या खात्यांचे कृषी विभागाकडून ई-केवासी पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारपासून (दि. 30) सरकारच्या वतीने अनुदान वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. जिह्यात अद्याप 1 लाख 78 हजार 391 शेतकऱयांच्या खात्याची ई-केवायसी बाकी असून, आठ दिवसांत ती पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

मागील आठवडय़ात कापूस आणि सोयाबीन पिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारने काही अटी शिथिल केल्या आहेत. यामुळे जिह्यातील 70 हजारांहून अधिक संयुक्त खाते असणारे शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत. यामुळे आधीच पाच लाख 30 हजार आणि आता नव्याने 70 हजार संयुक्त खातेदार असे जिह्यात जवळपास सहा लाख शेतकऱयांना कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी पात्र ठरणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

राज्य सरकारने 2023 च्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीन पिकांचे उत्पादन घेणाऱया शेतकऱयांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1 हजार रुपये आणि दोन हेक्टरपर्यंत प्रती हेक्टर 5 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार नगरसह राज्यभर कृषी विभागाकडून माहिती संकलित करण्यात येत आहे. सामायिक खात्यांमध्ये आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी खातेदारांचे स्वयंघोषणापत्र दिल्यानंतर मदत थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे. दरम्यान, कापूस अनुदानासाठी नगर जिह्यात 2 लाख 17 हजार 778 शेतकरी पात्र आहेत.

केवायसी पूर्ण झालेले तालुकानिहाय शेतकरी

n अकोले ः 21 हजार 645, जामखेड 19 हजार 840, कर्जत ः 7 हजार 192, कोपरगाव ः 27 हजार 969, नगर ः 17 हजार 616, नेवासा ः 46 हजार 56, पारनेर ः 24 हजार 465, पाथर्डी ः 31 हजार 639, राहाता ः 27 हजार 284, राहुरी ः 29 हजार 243. संगमनेर ः 31 हजार 681, शेवगाव ः 32 हजार 677, श्रीगोंदा ः 15 हजार 142, श्रीरामपूर ः 19 हजार 811.