पाच दिवस तुफानी पावसाचे

राज्यभरात पुढचे पाच दिवस तुफानी पावसाचे असतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामान ढगाळ राहील आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच ठाणे व पालघरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईसह उपनगरांत अधूनमधून मुसळधार पाऊस तर कधी मध्यम स्वरुपाच्या सरी पडतील, असे कुलाबा वेधशाळेने सांगितले.