महिनाभरात राज्यात 267 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; काळजीवाहू सरकारला बळीराजाची काळजी नाही

काळजीवाहू सरकारलाच शेतकऱ्यांची काही पडलेली नाही म्हणून काळजी वाटते. महाराष्ट्रात एकही आत्महत्या घडू देणार नाही असा शब्द देऊन, शब्द पूर्ण न करणारे निवडणुकीच्या काळात दिलेले शब्द पूर्ण करतील याची काय गॅरंटी आहे?

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला. एप्रिलच्या एका महिन्यात मराठवाडय़ात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी मतांची बेरीज वाढवण्यासाठी मेहनत घेतली जाते. मग शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा कमी करण्यासाठी का मागे पडलात, असा सवाल जयंत पाटील यांनी केला. पंतप्रधान मोदी यांनी मराठवाडय़ात चार प्रचारसभा घेतल्या. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री दिमतीला होते. मतांची बेरीज वाढवण्यासाठी मेहनत घेतली. पण शेतकऱ्यांची काळजी या काळजीवाहू सरकारला वाटली नाही. त्यामुळे यांच्या गॅरंटीवर काय विश्वास ठेवायचा, असा सवाल पाटील यांनी केला.