20 जुलैपासून कठोर उपोषण, जरांगे पाटील यांचा इशारा

मला माझ्या समाजासाठी काम करणे महत्त्वाचे आहे. एक महिन्याचा वेळ दिला. या महिन्यात काय झाले, काय केले, हे आमच्या लक्षात आले होते. मात्र 13 तारखेपर्यंत आरक्षण मिळणार नाही हेही कळाले होते. आजपासून आमची पुढची रणनीती सुरू झाली असून, 20 जुलैपासून कठोर उपोषण करणार असल्याचा इशारा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज आंतरवाली सराटीत पत्रकार परिषदेत संवाद साधताना बोलत होते.

जरांगे म्हणाले की, आम्ही सरकारकरचा विश्वास उडाला असे म्हणालो नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणकीस व छगन भुजबळ यांच्या सांगण्यावरून सगेसोयरे अंमलबजावणी होऊ देत नसतील, फडणवीस आरक्षण मिळू नये म्हणून मंत्र्यांवर दबाव आणत असतील, तर आता आरक्षण कसे मिळवायचे ते आम्ही बघू, असा इशाराही त्यांनी मिंधे सरकारला दिला.

समदुःखींनी एकत्र यावे

आरक्षणाचा लढा लढण्यासाठी कोणाला प्रस्तावा द्याला मला काही कळत नाही. आपण समान दु:ख असणारे बांधक आहोत. दलित, मुस्लिम, लिंगायत, धनगर, इतर समाज आपण सगळे समविचारी आहोत, आपण सगळय़ांनी एकत्रित यावे आणि द्यायचा दणका. एकत्रित यायला समाज कुठे नाही म्हणाला, मला काही नेते माहीत नाही, सगळे एकत्र आल्यास सगळय़ा समाजाला न्याय मिळेल. आपण सत्ता परिवर्तन करू शकतो. सगळे समाज एकत्र आले तर जातीवाद बंद होईल. मला नेतृत्व करायचे नाही. मला नेतृत्व करायची हौस नाही, मी मराठा सेवक म्हणून काम करीत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. सर्वांनी एकत्र यावे, बदल घडेल. तुम्ही नाही आले तर आम्ही सरकारला पाडायला मोकळे असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.

आमची तयारी सुरू झाली आहे

उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई सांगतील किंवा त्यांची लोक पाठवतील. काय झाले काय मिळवले. ते सांगतील ते काय काय झाले ते बघू या, त्यांचा फोन नाही आला तरी आमची तयारी सुरू झाली आहे. ज्या माणसाला आपण विरोधक मानत नाही तशांना उत्तर देणार नाही. त्यामुळे ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके जे म्हणतात, मुंबई जाम करावयाची त्यांना मी विरोधक मानत नाही. त्यांचा कर्ता करविता भुजबळ असून धनगर समाजाला वाटते एसटीतून आरक्षण मिळाले तर आपल्या लेकरांना आणखीन सुविधा मिळतील, असेही जरांगे पाटील म्हणाले.

काही मंत्री मराठय़ांकर अन्याय करतात

संयम आम्हीच किती दिवस बाळगायचा हा प्रश्न आहे. 13 तारखेपर्यंत मराठय़ांना आरक्षण मिळाले नाही पुढे कसे मिळवायचे ते आम्ही बघतो, 13 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरला लाखोंच्या संख्येने माता माउल्या सकाळी दहा वाजल्यापासून उपस्थित होत्या. रात्रीचे नऊ वाजले तरी त्या जागच्या हलल्या नाहीत. त्यामुळे आता 20 तारखेला कठोर उपोषण  करणार आहे. समाजाचे  म्हणणं आहे की, मी उपोषण करू नये. मात्र मला त्यांचे मन बदलावे लागेल. आपले बलिदान गेले तरी चालते. पण समाज मोठा झाला पाहिजे. त्यासाठी परत एकदा उपोषण करू असे मला वाटते.  उपोषणाने सरकार शहाणे झाले तर ठीक, नाहीतर नंतर आपण मुंबईला कधी जायचे याची तारीख आणि मराठय़ांची बैठक कधी ठेवायची, त्या वेळी ठरवू. महाराष्ट्राचे मत घेऊन 20 तारखेनंतर बैठक, तारीख ठरवली जाईल आणि तेव्हा फायनल केले जाईल. परत बैठक होणार नाही, सरकारचे अल्टिमेटम संपल्यानंतर सरकारकडून मला कुठलाच फोन किंका मेसेज नसल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.