मध्यान्ह भोजनात पाल, दिव्यातील 40 विद्यार्थ्यांना विषबाधा

दिव्यातील एका शाळेत 40 मुलांना विषबाधा झाली आहे. मध्यान्ह भोजनात पाल पडल्याने विद्यार्थ्यांना ही विषबाधा झाल्याचे सांगितले जात आहे. सर्व विद्यार्थ्यांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.