आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य दळभद्री; संभाजी भिडे गुरुजींचे वादग्रस्त विधान

‘आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं, ते दळभद्री स्वातंत्र्य आहे. हिंदवी स्वराज्य हे खरं स्वातंत्र्य आहे,’ असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे गुरुजी यांनी केले.

‘वटसावित्रीच्या पूजेला अभिनेत्रींनी किंवा ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. फक्त साडी घातलेल्या महिलांनी वटसावित्रीची पूजा करावी’ असे विधानही भिडे गुरुजी यांनी केले. संभाजी भिडे गुरुजी आणि ‘शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संघटनेचे धारकरी कार्यकर्ते या वर्षीदेखील पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पुण्यात दाखल झाले असून भिडे गुरुजींच्या विधानांनी नव्या वादाला तोंड फुटले आहे.