मोदी सरकारने गरीबांकडून हजारो कोटी रुपये उकळले, काँग्रेसचा गंभीर आरोप

मोदी सरकारने गरीबांकडून हजारो कोटी रुपये उकळले असा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच पंतप्रधान मोदी आपल्या उद्योजक मित्रांचे लाखो करोडो रुपयांचे कर्ज सहज माफ करतात असेही काँग्रेसने म्हटले आहे.


काँग्रेसने एक्स या सोशल मिडीयावर पोस्ट लिहून म्हटले आहे की मोदी सरकारने गरीब जनतेकडून 5 वर्षात 8 हजार 500 कोटी रुपये वसूल केले आहेत. बँकेत मिनिमम बॅलेन्सच्या नावाने हे पैसे सरकारने घेतल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या श्रीमंत मित्रांचे लाखो करोडो रुपयांचे कर्ज लगेच माफ करतात, पण गरीबांवर दंडाचा चाबूक उगारायला विसरत नाही. जनतेला महागाई, बेरोजगारी आणि वसूलीच्या चक्रव्युहात अडकवणाऱ्या मोदी सरकारला याचे जोरदार प्रत्युत्तर मिळेल. देशाची जनता मोदी सरकारचा हा चक्रव्युह नष्ट करेल असेही काँग्रेसने म्हटले आहे.