लेख – ‘एआय’मुळे भारताचा जीडीपी वाढेल!

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

भारत सरकारने एआय शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. एआयचा योग्य वापर करून भारत आपला जीडीपी लक्षणीयरीत्या वाढवू शकतो. अनेक वर्षे भारतातील अत्यंत हुशार विद्यार्थी आयआयटीमधून पास झाल्यानंतर अमेरिका किंवा युरोपच्या दिशेने वळायचे. परंतु आता अमेरिका आणि युरोपमध्ये मोठय़ा उच्च पदावर असलेले भारतीय आता भारतात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. म्हणजे थोडक्यात भारतामध्ये रिव्हर्स ब्रेन ड्रेन हे सुरू झाले आहे, ज्याचा भारताला नक्कीच मोठा फायदा होत आहे.

एआय हे तंत्रज्ञान जगभरात वेगाने विकसित होत आहे आणि भारतासारख्या देशासाठी यातून अनेक संधी उपलब्ध आहेत. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्या मते, एआयमुळे भारताच्या जीडीपी वाढीला फ़ार मोठी चालना मिळू शकते .भारत आणि अमेरिकेसारख्या देशांनी एआय नियम आणि इतर नियमांवर सहकार्य करणे आवश्यक आहे.

सत्य नाडेला यांची मायक्रोसॉफ्ट कंपनी मोठय़ा प्रमाणामध्ये भारतामध्ये या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत आहे. आपल्याला आठवत असेल की, दोन वर्षांपूर्वी भारत सरकारने सत्य नाडेला यांचा ‘पद्मविभूषण’ देऊन सन्मान केला होता आणि त्यानंतर मायक्रोसॉफ्टचा भारतामध्ये गुंतवणूक करण्याचा वेग नक्कीच वाढला आहे. सत्या नाडेला एआयच्या प्रसारासाठी भारताला एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून पाहतात, भारतीय इन्पह्टेक उद्योगासह तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचे प्रतिस्पर्धीसुद्धा हाच दृष्टिकोन बाळगतात. त्यांच्या अंदाजे पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेतील 500 अब्ज डॉलर्स हे तंत्रज्ञानाद्वारे सुसज्ज केलेल्या उत्पादकता सुधारणांमुळे असतील.

मायक्रोसॉफ्ट दोन बिलियन भारतीयांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोडर्सना प्रशिक्षण देणार आहे; कारण त्यांना वाटते, ही क्षमता भारतीयांमध्ये आहे. याशिवाय इतक्या मोठय़ा संख्येमध्ये आणि कमी किमतीमध्ये कोडर्स हे फक्त भारतातच मिळू शकतात. नाडेला यांना वाटते की, यामुळे मायक्रोसॉफ्टला खूप फायदा होईल आणि एआयमुळे जगात क्रांती होईल. अर्थात यामुळे भारताचासुद्धा खूप फायदा होईल. भारताला आपल्या आर्थिक प्रगतीचा रेट वाढवायचा आहे.

उत्पादकता वाढवणे – एआयमुळे अनेक कामे स्वयंचलित होऊ शकतात, ज्यामुळे मानवी श्रम आणि वेळेची बचत होते आणि व्यवसायांना अधिक स्पर्धात्मक बनण्यास मदत होईल.उत्पादकता वाढून उत्पादनात आणि सेवांमध्ये वाढ होऊ शकते.

दक्षता आणि कार्यक्षमता वाढवणे – एआयमुळे विविध क्षेत्रांत कार्यक्षमता आणि कार्यप्रणाली सुधारण्यास मदत होते. यामुळे वेळ आणि पैशाची बचत होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळते.

सरकारी सेवांमध्ये सुधारणा – एआयमुळे सरकारी सेवांमध्येही सुधारणा होतात. सरकारी अधिकाऱयांना नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा प्रदान करता येतील आणि भ्रष्टाचार कमी करता येईल.

ग्राहकांना चांगल्या सुविधा – एआयमुळे ग्राहकांना चांगल्या सुविधा आणि सेवा उपलब्ध होऊ शकतात. यामुळे ग्राहकांचे समाधान वाढून व्यवसायांना चालना मिळते.

आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा – एआयमुळे आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणता येईल. यामुळे लोकांचे जीवनमान सुधारून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. एआयमुळे डॉक्टरांना रोगांचे निदान आणि उपचार अधिक चांगल्या प्रकारे करता येतील आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे शिकवता येईल.

नवीन उद्योग आणि रोजगार निर्मिती – एआयमुळे अनेक नवीन उद्योग आणि व्यवसाय निर्माण होतील. एआय तंत्रज्ञान विकसित करणारे, एआय आधारित उत्पादने आणि सेवा प्रदान करणारे आणि एआय तंत्रज्ञान वापरणारे यामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊन अर्थव्यवस्थेची भरभराट होईल.

भारताकडे एआय क्षेत्रात प्रगती करण्याची मोठी क्षमता आहे. भारतात तरुण आणि कुशल लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात आहे. याव्यतिरिक्त भारत सरकार एआय क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. एआयचा योग्य वापर करून भारताची जीडीपी लक्षणीयरीत्या वाढवता येऊ शकते. भारत सरकार आणि उद्योगांनी या क्षेत्रात अधिक गुंतवणूक करून एआय तंत्रज्ञानाचा लाभ घेणे गरजेचे आहे.

काही आव्हाने

डेटा आणि पायाभूत सुविधा – एआय तंत्रज्ञानासाठी मोठय़ा प्रमाणात डेटा आणि मजबूत पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. भारतात डेटा गोळा करणे आणि व्यवस्थापित करणे अजूनही एक आव्हान आहे. सरकारने डेटा गोळा करण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी योग्य धोरणे आणि पायाभूत सुविधा विकसित करणे आवश्यक आहे.

कौशल्य प्रशिक्षण – एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक काwशल्ये असलेले कामगार भारतात मर्यादित आहेत. सरकारने एआय शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवून आवश्यक काwशल्ये असलेले कामगार तयार करणे आवश्यक आहे.

नियामक वातावरण – एआय तंत्रज्ञानासाठी योग्य नियामक वातावरण तयार करणे आवश्यक आहे. सरकारने एआय तंत्रज्ञानाचा वापर नियंत्रित करण्यासाठी आणि त्याचा गैरवापर टाळण्यासाठी योग्य कायदे आणि नियम बनवणे आवश्यक आहे.

विशिष्ट तंत्रज्ञान (niche technologies), व्यत्यय आणणारे तंत्रज्ञान (disruptive technologies), कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), क्वांटम संगणन, ड्रोन तंत्रज्ञान यामुळे युद्धपद्धतीमध्ये क्रांती होत आहे आणि हे तंत्रज्ञान रशिया, युव्रेन, हमास, इस्रायलमध्ये मोठय़ा प्रमाणात वापरले जात आहे आणि ज्यामुळे पारंपरिक शस्त्र म्हणजे फायटर विमाने, मोठय़ा लढाऊ बोटी, रणगाडे त्यांची मोठी शिकार बनत आहेत. अत्यंत कमी खर्चामध्ये जुन्या महागडय़ा शस्त्रांची अत्यंत कमी किमतीमध्ये शिकार करण्यात येत आहे.

परंतु या प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करणे आणि त्याचा भारतीय सैन्यामध्ये आणि इतर क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात वापर करण्याकरता आपल्याला पुष्कळ संशोधन करावे लागेल. हे संशोधन खर्चिक असते आणि याकरता सध्याच्या बजेटमध्ये जाहीर झालेला फंड सरकारी आणि प्रायव्हेट कंपनीत वापरला जाईल, यामुळे प्रायव्हेट पंपन्यांनासुद्धा कमी खर्चामध्ये भांडवल मिळू शकेल आणि आपला तंत्रज्ञानाचा विकास हा जास्त वेगाने होईल.