फडणवीस 15 दिवस का शांत होते? अनिल देशमुख यांचा सवाल

देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच सचिन वाझे आणि परमबीर सिंह पोपटासारखे बोलताहेत, अशी टीका करतानाच, फडणवीसजी! तुम्ही 15 दिवस का शांत होता? आता माझ्यावर आरोप करावयाचे तुम्हाला आठवले काय? असा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

अनिल देशमुख यांनी आज ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात ट्विट केले आहे. फडणवीसांसह भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांना अटक करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्लॅन होता, असा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्या वक्तव्याला फडणवीस यांनीही दुजोरा दिल्याने अनिल देशमुख यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

दोन पोपट बोलताहेत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना खोटय़ा केसेसमध्ये अडकवण्याचे कारस्थान फडणवीस यांनी रचले होते. ते पंधरा दिवसांपूर्वी मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणले होते. आता फडणवीस वाझे आणि परमबीर या पोपटांकरवी माझ्यावर आरोप करत आहेत, असे देशमुख म्हणाले.