गद्दार आणि हुकूमशहांना गाडायचंच! – आदित्य ठाकरे

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया नोंदवली. देशात हुकूमशाही आणून संविधान संपवू पाहणाऱयांना घरी बसवण्याची संधी जवळ आली. आता चुकायचं नाही, हटायचं नाही, मागे फिरायचं नाही. प्रत्येकाने सज्ज व्हायचं, महाराष्ट्र हित हेच खरं देश हित, हे लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी लढायचं, विजयी व्हायचं, असे आवाहन करतानाच गद्दारांना आणि हुकूमशहांना गाडायचंच, असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी केला.