ज्यांच्याकडे प्रश्नांची उत्तरं नसतात, तेच भूतकाळावरून लोकांना लढवत ठेवतात. म्हणूनच भूतकाळापेक्षा भविष्यकाळासाठी लढणाऱ्यांची निवड करा, असं आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मतदारांना केलं आहे.
View this post on Instagram
आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून पोस्टच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी हे आवाहन केलं आहे. ते लिहितात की, ज्यांच्याकडे भविष्यात देण्यासाठी काहीही नसतं, तेच तुम्हाला भूतकाळावरून झगडत ठेवतात. ज्यांच्याकडे प्रश्नांची उत्तरं नाहीत, ते भूतकाळावर त्याचं खापर फोडतात. जे तुमच्या स्वतंत्र विचारांपासून आणि स्वप्नांपासून रोखतात, तेच तुम्हाला काल्पनिक भीती दाखवत राहतात. त्यामुळेच आजचं राजकारण हे वर्तमान आणि भविष्यापेक्षा भूतकाळाबाबत जास्त बोलताना दिसतंय. त्यामुळे आपण आपल्याला भूतकाळात गुंतवणाऱ्यांपेक्षा आपल्या भविष्यासाठी लढणाऱ्यांना निवडुया, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमधून केलं आहे.