हा महाराष्ट्र आहे, ना तुटेगा, ना बटेगा, ना कटेगा; संजय राऊत यांनी ठणकावले

महाविकास आघाडीत सर्व उत्तम सुरू आहे. आम्ही 90-90-90 जागा जाहीर केल्या आहेत. आमच्यात उत्तम समन्वय आहे, कोणीही चिंता करू नये, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट करत चांगलाच टोला लगावला. महाविकास आघाडी 175 जागा जिंकत 26 नोव्हेंबरला सरकार स्थापन करणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच महाराष्ट्रात भाजपचे कटेगा, बटेगा, तुटेगा राजकारण चालणार नाही, असेही संजय राऊत यांनी ठणाकावले

भाजप हा संस्कारहीन पक्ष आहे. त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. अनेक विकृत लोकं त्या पक्षात भरलेले आहेत. घरंदाज महिलांबाबत, राजकारणातील महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत, अपशब्द वापरत त्यातूण तणाव निर्माण करण्याचा नवा धंदा भाजपने सुरू केला आहे. त्यातून त्यांना द्वेष पसरवायचा असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

योगी आदित्यनाथ यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत. ते त्यांच्या राज्यात भाजपला वाचवू शकले नाहीत. ते महाराष्ट्रात येऊन काय करणार आहेत. बटेंगे, कटेंगे अशी भडकाऊ भाषणे ते दतील. मात्र, हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात कटेंगे, बटेंगे राजकारण चालणार नाही, असेही संजय राऊत यांनी ठणकावले. सगळ्यांचा साथ मिळवत सब का विकास हेच महाविकास आघाडीचे ध्येय आहे. जनतेला आता सर्व समजले आहे, त्यामुळे महाराष्ट्र अब नही तुटेगा और नाही बटेगा, असेही त्यांनी स्पष्ट केले.