आम्हाला मुंबईच्या खड्ड्यांची सवय…; सुनील गावसकर असं का म्हणाले? वाचा सविस्तर…

टीम इंडियाचे दिग्गज माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी लखनौवरून अयोध्येला जाताना आलेला अनुभव सांगितला आहे. यावेळी त्यांनी आम्हाला मुंबईतील खड्ड्यांची सवय असल्याचे म्हटल आहे.

टीम इंडियाविरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये कानपूर येथे दुसरा कसोटी सामना सुरू आहे. सुनील गावसकर गुरूवारी (26 सप्टेंबर 2024) अयोध्येला प्रभु श्री रामाचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते आज कानपूरमध्ये समालोचनासाठी दाखल झाले आहेत. यावेळी समालोचन करत असताना त्यांनी लखनौवरुन अयोध्येला जात असताना आलेला अनुभव सांगितला.

समालोचन करताना टीम इंडियाचा माजी खेळाडू दिनेश कार्तिकने त्यासंदर्भात विचारना केली असता, त्यांनी आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले की, “आम्हाला तर मुंबईच्या खड्ड्यांची सवय आहे. असं वाटतं की मुंबईत रस्ते बनवणाऱ्याची दरवर्षी Benefit Match असते. ते दरवर्षी रस्ते तयार करतात आणि दरवर्षी तिथे खड्डे पडतात.” असं सुनील गावसकर म्हणाले.