राहुल गांधी यांना दहशतवादी म्हणणे हे पाप; काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

भाजप राहुल गांधी यांच्याविरोधात मोठे कटकारस्थान आणि षडयंत्र रचत आहे. गांधी घराण्याने देशासाठी बलिदान दिले आहे. असे असताना भाजप नेते राहुल गांधी यांना मारण्याची धमकी देत आहेत. भाजप नेते राहुल गांधी यांना दहशतवादी म्हणत आहेत. राहुल गांधी यांना दहशतवादी म्हणणे हे पाप आहे, अशा शब्दांत काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे.

भाजप नेते राहुल गांधी यांना मारण्याची धमकी देत आहेत. ते राहुल गांधी यांना दहशतवादी म्हणत आहेत. भाजपने राजकारण खालच्या स्तराला नेले आहे. भाजपमधील नेतेच धमकीचा भाषा करत आहेत. त्यांच्या वरिष्ठांच्या आदेशानेच हे होत आहे काय,असा संतप्त सवाल अजय माकन यांनी केला आहे. तसेच आम्हाला कितीही धमक्या द्या, मात्र आमचा आवाज तुम्ही दाबू शकणार नाही, असा इशाराही माकन यांनी दिला आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या मिंधे गटातील नेत्याने राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देण्यात येईल, असे विधान केले आहे. याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला आहे, असेही माकन म्हणाले.

भाजप नेते अशा प्रकारची दर्पोक्ती करत आहेत. धमक्या दोत आहे. राहुल गांधी यांना दहशतवादी म्हणण्यात येत आहे. असे असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा अशा नेत्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत, हे दुर्दैवी आहे, असे काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे.