किर्गिस्थान मध्ये अडकले यवतमाळचे 5 विद्यार्थी, पालक चिंतेत; पाल्याना सुखरूप मायदेशी आणण्याची मागणी

>> प्रसाद नायगावकर 

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील पाच विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी किर्गिस्थान येथे गेले आहेत. सध्या किर्गिस्थान येथे भारतीय आणि पाकिस्थान येथील विद्यार्थ्यांवर लोकल विद्यार्थी हे हल्ला करीत आहेत. यामध्ये आतापर्यंत चार पाकिस्थानी विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली आहे. सुदैवाने यवतमाळचे हे विद्यार्थी अद्याप सुखरूप आहेत. पण किर्गिस्थान येथील गंभीर परिस्थितीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत . त्यांच्या पालकांनी सरकारला या विद्यार्थाना मायदेशात सुखरूप आणण्याची विनंती केली आहे .

भारतातील असंख्य विदयार्थी हे वैद्यकीय शिक्षणाकरिता आणि इतर अभ्यासक्रमाकरिता परदेशी जातात. अशातच भारतातील जवळपास 14500 विद्यार्थी हे शिक्षणासाठी किर्गिस्थान येथे गेले आहेत. यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील पाच विद्यार्थी हे किर्गिस्थानची राजधानी ब्रीस्टेक येथे वैद्यकीय अभ्रासक्रमाकरिता गेले आहेत. दरम्यान लोकल विदयार्थी आणि इजिप्तशिअन विद्यार्थ्यांमध्ये भांडणे झाली . यामुळे लोकल विद्यार्थ्यांनी इतर देशातील विद्यार्थाना सुद्धा आपला निशाणा बनविला आहे . यामुळे आपल्या पाल्याच्या सुरक्षिततेसाठी यवतमाळचे पालक अतिशय चिंताग्रस्त आहेत

यवतमाळच्या या विद्यार्थ्यांची परीक्षा लवकरच आटपत आहे आणि तिथली परिस्थिती बघता यवतमाळच्या पालकांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने वेळीच पावले उचलीत या विद्यार्थ्यांना विमानाची व्यवस्था करून मायदेशी परत आणण्याची कळकळीची विनंती केली आहे .