पोलीस भरतीत सवलत देण्यास मिंधे सरकारचा नकार

तृतीयपंथींना पोलीस भरतीत सवलत द्यावी, मॅटने मिंधे सरकारला दिले आहेत. त्याविरोधात मिंधे सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने दोन तृतीयपंथींना नोटीस जारी केली आहे.

न्या. अतुल चांदूरकर व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने ही नोटीस जारी केली आहे. मिंधे सरकारच्या याचिकेचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने आर्या पुजारी व विनायक काशीद यांना दिले आहेत. यावरील पुढील सुनावणी 25 एप्रिलला होणार आहे.

मॅटचे आदेश

कट ऑफपर्यंत पोहोचण्यासाठी या दोघांना ग्रेस मार्क द्या अथवा एकूण गुणांच्या 50 टक्के गुण या दोघांना मिळाले असल्यास त्यांची निवड करावी, असे आदेश मॅटने शासनाला दिले. त्याविरोधात मिंधेंनी याचिका दाखल केली.

काय आहे प्रकरण

काशीद व आर्या यांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केला होता. काशीद यांना शारीरिक चाचणीत 35 तर लेखी परीक्षेत 54 गुण मिळाले. त्यांना एकूण गुण 89 मिळाले. आर्या यांना शारीरिक चाचणीत 39 तर लेखी परीक्षेत 63 गुण मिळाले. त्यांना एकूण 102 गुण मिळाले. ओबीसी प्रवर्गातून तृतीयपंथींना आरक्षण देण्यात आले होते. महिलांसाठी 112 गुणांचा कट ऑफ होता, तर सर्वसामान्यांसाठी 126 गुणांचा कट ऑफ होता. कट ऑफसाठी आवश्यक गुण न मिळाल्याने त्यांची निवड झाली नाही. पोलीस भरती होण्यासाठी या दोघांनी मॅटमध्ये धाव घेतली. मॅटने या दोघांच्या बाजूने निकाल दिला.