हा कंत्राटदारासाठी असलेला अर्थसंकल्प, आदित्य ठाकरे यांची टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. हा अर्थसंकल्प फक्त कंत्राटदारांसाठी असल्याची टीका त्यांनी केली. सोशल मीडियावरून आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत टीका केली आहे.

”राज्याचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. हा कंत्राटदारासाठी असलेला अर्थसंकल्प आहे. सध्याचे हे जे सरकार आहे ते फक्त इतरांनी केलेल्या कामाचे श्रेय मिळवण्याचे काम करतेय. हे सरकार केवळ आश्वासने देण्यापुरती आहे, त्यापैकी एकही पूर्ण केलेले नाही. गेल्या 2 वर्षांच्या अर्थसंकल्पाचाही अभ्यास करून त्यातील किती योजना प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत ते बघावे लागेल, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.