भाजपला केवळ धर्माच्या नावावर राजकारणाची भाकरी भाजण्याचं काम येतं! – संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून नाशिक येथे त्यांनी काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतले. याआधी त्यांचा रोड शो देखील झाला. मात्र मोदींच्या या दौऱ्यादरम्यान कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी नेत्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा दिल्या असून त्यांनी स्थानबद्ध करण्यात आले. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. संजय राऊत यांनी शुक्रवारी दुपारी एक ट्विट केले.

फडणवीस शूर्पणखेच्या भूमिकेत, महाराष्ट्राची दिशाभूल करताहेत; संजय राऊत यांची टिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला काळाराम मंदिरात दर्शनासाठी आले, आनंद आहे! पण दर्शन झाल्यानंतर थोडा वेळ काढून जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही त्यांनी भेटायला पाहिजे होतं. नाशिक जिल्हा हा देशातील सर्वात मोठं कांदा उत्पादक जिल्हा आहे, पण कांदा निर्यात बंदीमुळे इथला शेतकरी पार कोलमडून पडलाय. पंतप्रधान या शेतकऱ्यांना का भेटले नाहीत? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला.

नशेपासून लांब राहा; माता, बहिणींवरून शिव्या देऊ नका! पंतप्रधान मोदींचं नाशिकमधून तरुणांना आवाहन

राजकारण करायला वेळ आहे, पण देशाला पोसणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू दिसत नाहीत. भाजपला केवळ धर्माच्या नावावर राजकारणाची भाकरी भाजण्याचं काम येतं.हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, असा हल्लाबोलही राऊत यांनी केला.