रेसकोर्स आणि मुंबईतील ओपन स्पेसच्या जमीन बळकावून त्या मिंध्यांच्या मित्राला देण्याचा डाव आहे का, असा रोखठोक सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी एक पत्रही सोशल मिडीयावर पोस्ट केले आहे. त्यात या जागोबाबत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत याबाबत काही सूचनाही केल्या आहेत.
My open letter to Mumbaikars over the Racecourse and Open Space land grab:
Dear open space lovers,
This is my open letter to you about the Mahalaxmi Racecourse and the attempt by the bjp sponsored regime to gulp it.
The minute I heard about the secret meetings of the 4 RWITC…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 9, 2024
या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, महालक्ष्मी रेसकोर्सबद्दल आणि भाजप पुरस्कृत राजवटीच्या प्रयत्नांबद्दल हे माझे तुम्हाला खुले पत्र आहे. ज्या क्षणी मला RWITC समिती सदस्यांच्या एका बिल्डर मित्राच्या बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांच्या गुप्त बैठकीबद्दल समजले आणि मी त्या विरोधात बोललो आणि त्यांचा जमीन हडपण्याचा प्रयत्न उघड केला आहे. भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करण्यासाठी, 4 समिती सदस्यांनी, RWITC सदस्य आणि मुंबईकरांच्या मंजुरीशिवाय एक करार केला. ज्यामध्ये बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांनी निवडलेल्या 50 आजीवन सदस्यत्व पुरस्कारासारख्या लाच आणि नंतर त्यांनीच निवडलेल्यांना वार्षिक आजीवन सदस्यत्व देण्यात आले आहे. वरळीतील 226 एकर खुली जागा बळकावण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला मी विरोध करतो, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
यावर आदित्य ठाकरे यांनी काही सूचनाही केल्या आहेत. भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करा, ज्यामध्ये कोणत्याही बांधकामास परवानगी देण्यात येणार नाही. मुंबईकरांना त्यांच्या दैनंदिन कामांसाठी रेसकोर्सवर मोफत प्रवेश मिळेल. केवळ बागकाम आणि लँडस्केपिंगसाठी प्रशंसित शहरी नियोजकांचे पॅनेल तयार करा, ज्यासाठी RWITC द्वारे पैसे दिले जातील. त्यामुळे नागरिकांचे सध्याचे सर्व उपक्रम नियमित सुरू राहतील, असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच RWITC ला ते पूर्णपणे नको असल्यास ते क्रीडांगण आरक्षण खुली जागा म्हणून घोषित करा. त्यामुळे नियमित कामकाज सुरळित सुरु राहणार आहे. RWITC च्या 4 समिती सदस्यांनी वाटाघाटी केलेल्या सध्याच्या करारानुसार BMC RWITC साठी स्टेबल बांधण्यासाठी ₹100 कोटी खर्च करणार आहे. एक वर्षाहून अधिक काळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिंधींच्या अनुपस्थितीत, करदात्याच्या पैशांतून 100 कोटी रुपये खर्च करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना कोणी दिले आहेत? असा सवालही त्यांनी केला.
RWITC खर्च करू शकते आणि करणे आवश्यक आहे. रेसकोर्समधील काही “बेकायदेशीर घरे” सामावून घेण्यासाठी काही पसंतीच्या बिल्डरला अतिरिक्त मोफत एफएसआय दिला जाईल. परंतु ते प्रत्यक्षात केले जाईल की रेसकोर्सवर बांधकाम करण्यासाठी जमीन बिल्डरला दिली जाईल याबाबत स्पष्टता नाही. BMC आणि RWITC रेसकोर्सवर काही फॅन्सी मोठे क्लब हाऊस बांधणार का? बेकायदा मुख्यमंत्र्यांचा एखादा कंत्राटदार मित्र ते बांधून चालवणार, असा महत्त्वाचा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जर RWITC समिती लोकांच्या इच्छेविरुद्ध गेली आणि बेकायदा मुख्यमंत्र्यांनी त्याला सहमती दर्शवली, तर आम्हाला समितीला विरोध करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. याला सहमती देण्यासाठी कोणता दबाव किंवा काही व्यवहार केला होता हे आम्हाला माहीत नाही. या 4 समिती सदस्यांना आमच्या मुंबईच्या जमिनीचे काय करायचे ते निवडण्याचा अधिकार कोणी दिला आहे, असा सवालही त्यांनी केला आहे.
मुंबईत प्रदूषण वाढले आहे. त्याबाबत कोणताही कार्यवाही करण्याती तसदी कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने घेतली नाही. तसेच रेसकोर्स आणि मोकळ्या जागा बळकावण्याचा भाजप प्रायोजित बेकायदा मुख्यमंत्र्यांचा डावाला आमचा विरोध आहे.आपल्या मोकळ्या जागेचे रक्षण करण्यासाठी मुंबईकर म्हणून आपल्याला पक्ष, विचारसरणी आणि सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीच्या पलीकडे जाण्याची गरज आहे. मी आमच्या शहरासाठी उभा राहीन, आणि मला आशा आहे की तुम्हीही उभे राहाल! असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.