रत्नागिरीत अवकाळी पाऊस, आंबा बागायतदार कोलमडला

सोमवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. नुकताच आलेला मोहोर आणि छोटी कैरी पावसामुळे गळून पडली. सोमवारी रात्री एक वाजता अवकाळी पावसाने हजेरी लावली.

पहाटे पाच वाजेपर्यंत पाऊस पडत होता. अचानक आलेल्या पावसाने आंबा बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. हवामानातील बदलामुळे आंबा बागायतदार दरवर्षी संकटात सापडत आहे. यंदा जानेवारी महिन्यात आलेल्या पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

आंबा झाडांवरील मोहोर आणि छोटी कैरी गळून पडल्याने बागायतदार कोलमडला आहे. नुकतीच फवारणी केलेल्या कलमांचेही नुकसान झाले असून आता पुन्हा फवारणी करावी लागणार आहे. अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलाचा कोकणातील आंब्यावर विपरित परिणाम होत आहे. गतवर्षी आंब्याचे 12 टक्केच उत्पादन आले होते. यंदा जानेवारीत झालेल्या पावसामुळे आंब्याचे उत्पादन घटणार आहे.